माझ्या, तुमच्या खरंतर सगळ्यांच्याच आयुष्यातला "कॉलेज आणि कॉलेजमधली प्रकरणं" हा न विसरणारा आणि जन्मभर पुरणारा विषय... १० वर्षांनी भेटल्यावर सुद्धा मित्राचा पहिला प्रश्न असतो "काय रे बाळ्या, तुझी "ती" कशी आहे?? काही Contact अजुन??" आणि त्यावर बाळ्याचं ठरलेलं उत्तर "अरे बंड्या, नक्की कोणाबद्द्ल विचारतोयस??"
खरंच, कॉलेज आणि नवीन नोकरी लागल्यानंतरचे ते सोनेरी दिवस म्हणजे सगळ्यांसाठीच एक पर्वणी असते... एक कधीही न विसरणारा प्रवास असतो.. ह्याच प्रवासाचं हे एक छोटसं प्रवासवर्णन...
तुझे माझे ते दोन क्षण अजुन मला आठवतात
हलक्या पावसाच्या त्या बेधुंद सरी अजुनही सुखावतात...
पहिल्यांदाच डायल केलेला तुझा नंबर अजुनही आठवतो
आणि नंतर मिळालेला दादाचा ओरडा अजुनही हसवतो...
रोज रात्रीचं आपलं तेच तेच बोलणंही किती नवीन वाटायचं
"उद्या काय?" म्हणता म्हणता खरंच "उद्या" उजाडायचं...
मग पुन्हा तीच लोकल, तोच डबा, तीच माणसं अन् त्याच गप्पा
तोच बेंच, तोच प्रोफेसर, तेच लेक्चर पण तुझा माझा विषयच निराळा...
कॅन्टिन मधला कटिंग आणि मित्रांचा कट्टा
त्यात तुझं माझं वेगळं राहणं मग मित्रांची थट्टा...
संध्याकाळच्या लोकलनी मग पुन्हा घरी निघायचं
तुझा नंबर डायल करून तेच रुटिन चालू करायचं...
प्लेसमेंट्स झाल्या कॉलेज संपलं नवीन आयुष्य सुरू झालं
ट्रेन बदलली, माणसं बदलली पण रुटीन मात्र तेच राहिलं...
मग पुन्हा एकदा तेच ऑफिस, तोच प्रोजेक्ट, तेच कलिग्स्
त्याच पार्टीस्, त्याच मिटींग्स् पण पुन्हा तुझा माझा अजेंडाच निराळा...
आता फक्त वाट बघतोय त्या तुझ्या होकाराची
तुझ्या मझ्या ड्युएटची आणि आई बाबांच्या प्रश्नांची...
असं वाटतंय पुन्हा एकदा तसंच कहीसं म्हणावं
तेच नातलग, तीच माणसं, घरही तेच पण तरिही तुझा माझा संसारच निराळा…
Zakas kavita ahe... june divas athavle!!!
ReplyDeletekhup chan... kharach chan aahe.... :) :)
ReplyDelete