शेतकरी आणि त्यांचे जिवा-शिवा याचं अतूट नातं आपल्याला माहीतच आहे. पण जिवा-शिवांच्या गळ्यातले दोर हे आता शेतक-याच्या गळी येत आहेत.
शेतीशास्त्र आणि शेतकरी कितीही पुढे जात असले तरी सावकाराकडून त्यांची सुटका अजुनही होत नाहीये. आमिषांना बळी पडणारे शेतकरी ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही.
आशाच आमिषांना भुललेल्यांची ही कहाणी.
नभ दाटून दाटून कसा काळोख पडला
बैल नांगरी लागला, चातक वरी आला
ढग दाखवी आमिष, पाण्याने ओतप्रोत
एक झुळुक वा-याची, जाई पनतीची जोत
मग तांबड्या तांबड्या भुईस रग लागे
इथं मुरंत हुतं पाणी, ठिपुस शोधु लागे
सावकारी दाही दिशा होई जिवा वण वण
घरा कुटुंब बसले घेऊन हाती प्राण
मग शोधु लागे वॄक्ष उभा वेशीवरी दूर
लावी आतडीस पीळ चार पैसाची ती दोर
-मंगेश
No comments:
Post a Comment